रोज काही लिहीत रहावे
आहे असे काहीसे ठरवले…!
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले….!!
आहे असे काहीसे ठरवले…!
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले….!!
फक्त कवितेतून बोलायची..!
जे जे यायचे मनी ते
यमकातून मांडायची…!!
पण आता आहे प्रश्न पडला
यमके कशी जुळवायची ?
मनीच्या भावांची कवितेतून
भट्टी कशी जमवायची!!
प्रेरणा असते कविते मागे
ती आता सोबत नाही !
यमक गेले तिच्या संगे
म्हणून कविता पूर्ण करायची !!
महेंद्र धाडवे
Comments
Post a Comment