Skip to main content

Posts

Showing posts from May, 2011

आठवण

आठवण येते कधी मला  अन गालावर खुदकन खळी पडते ! तर कधी हस्त हस्त  डोळी   माझ्या पाणी आणते!! गर्दीत रडून सुद्धा ती एकांतात आभास देते ! अन  एकांतात गेलो तरी मला  नाही कधी एकटे सोडते !! डोळे  बंद केल्यावरचे  नवे विश्व दाखवून देते! अन उघड्या डोळ्यानाही  ती कधी धुंद करून टाकते!!  दूर लोटायचा प्रयत्न केला  तर अधिकच जवळ येऊन बसते! जवळ तिला बळावले तर मात्र कोपऱ्यात कुठे दडून बसते !! हीच आहे ती माझी  मैत्रीण  नेहमी साथ देणारी ! आगंतुक असली तरी हवी- हवीशी वाटणारी !!  महेंद्र धाडवे 

रोज काही लिहीत रहावे

रोज काही लिहीत रहावे आहे असे काहीसे ठरवले…! पुन्हा प्रयत्न करायचा, मिळवायचे जे जे हरवले….!! होती कधी सवय मला फक्त कवितेतून बोलायची..! जे जे यायचे मनी ते यमकातून मांडायची…!! पण आता आहे प्रश्न पडला यमके कशी जुळवायची ? मनीच्या भावांची कवितेतून भट्टी कशी जमवायची!! प्रेरणा असते कविते मागे  ती आता सोबत नाही ! यमक गेले तिच्या संगे  म्हणून कविता पूर्ण करायची !! महेंद्र धाडवे 

तारुण्याच्या उंबरठ्यावर

पाहताच तिला डोळ्या  समोर,  उचांक गाठतो आनंदाचा ! होते मन उदास माझे ,  ती नज़रेआड़ असताना! सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? "आज तिच्याशी  मी बोलनारच" ,  ठरवले असते मनाने पक्के ! सुरवात करते बोलायल ती   अन अबोल होते मन माझे  !!   सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? नाही ती miss universe ,    नाही ती अप्सरा  पण, कोणास माहित कोणास ठाऊक , हूर हूर  होते मनात माझ्या  तिच्या सोबत बसतांना!!   सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? काय   म्हनू मी याला  प्रेम , आकर्षण  की फक्त मनाचा  गोंधळ ? यक्ष प्रश्न पडला मला या  तारुण्याच्या   उंबरठ्यावर  सांगा  हो मला कोणीतरी,  खरच हे प्रेम की फक्त मनाचा  गोंधळ ? महेंद्र धाडवे